बुधवार, २९ जुलै, २०१५

देशभक्त X देशद्रोही : तुलना.

माणसाच कर्म कस असाव ?
माणुस गेल्यावर निदान काही दिवस तरी इतरांना, जे सगळे त्याच मार्गाला जायच्या रांगेत ऊभे आहेत, निदान काही दिवस तरी वाईट वाटाव.
डॉ. अब्दुल कलाम आपल्या कर्तुत्वाने अन अदबशिर वागण्याने जनमानसाच्या गळ्यातील ताईत बनलेत, त्यावेळेस लोकांनी हे बघितले नाही कि त्यांचा धर्म कोणता आहे.
लोकांना फ्क्त एकच माहित होत "हा एक बाप माणुस आहे." अन ज्या देशाबद्दल आम्हाला प्रेम आहे त्या देशाची मान जगात ऊंच ठेवण्या साठी हा माणुस झटत असतो. या माणसाच्या रक्तात देशभक्ती ठासुन मुरलेली आहे.
गेले दोन दिवस सर्व मिडीयात हा माणुस पुरुन ऊरला. लोकांना या बाप माणसाचे किती गुण गाऊ अन किती नको असे झालय.
थोडक्यात सांगायच तर "दोन दिवस भारतीय जनता दु:खच्या सागरात बुडालेली आहे."
एक थोर देशभक्त, वैज्ञानिक, खर्‍या अर्थाने नेता, कलाकार, रसिक, हाडाचा शिक्षक ...... अन बरच काही त्यांच्यात होत..... अन सर्वात मोठ्ठ होत ते माणुसपण.
डॉ. अब्दुल कलामांना ऎकण्याच व जवळुन बघण्याच परम भाग्य मला लाभलय.
.
.
.
दु:खात बुडालेल्या भारतीय जनतेला सुखावूना जाणारी एक झुळुक आज दुपारनंतर प्रसार माध्यमां मधे आली अन परत फेसबुक सारखी माधमे एका दुसर्‍या लाटेने भरुन गेली.
उद्या सकाळी एका देश द्रोह्याला फाशी होणार हिच ती झुळूक.
.
देशभक्ताच्या जाण्याने दु:खात बुडालेल्या जनतेला देशद्रोह करणार्‍याला फाशी होणार म्हणताच काही प्रमाणात तरी आनंद झालाय.
काळाचा महिमा तरी कसा, दोघेही उद्या याच देशाच्या मातित सामावले जाणार आहेत.
— © Ajay Bhange

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा