बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - २

महाविद्यालयीन प्रवेशाची समस्या सोडवण्यासाठी मुख्यत: काही बाबींचा विचार केल्यावर खालील समस्या प्रकर्शाने जाणवल्या.
१. प्रवेश अर्ज विकत घेणे.
२. अर्ज भरल्यावर तो संबंधित महाविद्यालयात जमा करणे.
३. अर्ज जमा केल्यावर महाविद्यालयात जाऊन गुणवत्ता यादी बघणे.
४. आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळे पर्यंत प्रवेश घेणे व रद्द करणे यात बराच पैसा वाया जातो.
     वरिल चारही बाबतीत विद्यार्थ्याला व सोबत पालकांना बराच वेळ रांगेत उभे रहावे लागते जे सर्वांनाच गैरसोयीचे आहे. कारण यात बराच वेळ उगाचच वाया जातो व एखाद्या विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त महाविद्यालयात अर्ज करायचा असेल तर त्याला तितक्याच जास्त महाविद्यालयात रांगेत उभे रहावे लागते.
     प्रत्येक अर्जासोबत सत्य प्रतिलीपी जोडावी लागते ज्यामुळे त्याला झेरॉक्सचा नाहक भुर्दंड पडतो.
    प्रवेश मिळेपर्यंत विद्यार्थ्याचा जीव टांगणी वर असतो ज्यामुळे त्याला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
   या संगणकाच्या युगात शासनाने आठव्या वर्गापासुन जर शाळानिहाय विद्यार्थ्यांची माहिती गोळा करुन ठेवली व महाविद्यालयीन प्रवेशा वेळी संबंधित महाविद्यालयांना ती माहिती पुरवण्यात आली तर कोणताही अर्ज न भरता सर्व महाविद्यालयांना प्रवेश देणे सोयीचे होईल. या पद्धतीत कागदाचा होणारा वापरही कमी होईल व ते पर्यावरणाच्या पण हिताचे असेल.
(शासन कशाप्रकारे ही माहिती गोळा करु शकते व त्याचा वापर कसा करता येईल हे पुढील लेखात.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा