मोबाईल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मोबाईल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १३ सप्टेंबर, २०१०

प्रगति ?

बरेच वर्षांपूर्वी आमच्या गावात दूरदर्शन नव्हत. गावातल्या एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्ति कडेच फोन असायचा.  मोबाईल नावाची गोष्ट कल्पनेच्या बाहेरची होती. सामान्य माणसाची कमाई मोजकिच असायची. वाण्याच्या दुकानात लेस, कुरकूरे वा तत्सम खाद्य पदार्थांची पाकिटे दिसत नव्हती. टेप रेकॉर्डर ज्याच्या घरी तो भाव खात असे. सामान्य माणुस रेडिओची वार्षिक लायसन्स फी भरुन मोठ्या आनंदाने गाणे ऎकत असे. शेतीवाणी पासुन बातम्या ऎकणे हा त्याचा सुखाचा खुराक असायचा. तरिही तो सुखी होता.
आज मुलांना कळायला लागल की त्यांना मोबाईल हवा असतो, iPod कानाला लावूनच दिवसाची सुरवात होते, घरात २४ तास चालणारे TV चॅनल्स आहेत, करमणूकीचे हजार मार्ग आहेत, बाजारात गेल्यावर गरजेच्याच नव्हे तर बिन गरजेच्या कित्येक वस्तु खरेदी करायची ताकद आहे. आठवून बघा आपला DVD Player शेवटचा कधी वापरला होता. घरातल्या सिडी किती दिवसात वापरल्या नाहीत. साध्या सिनेमा घरातली ढेकूण, डास नको व त्यामुळे मल्टी-प्लेक्स शिवाय सिनेमा बघवत नाही. तरिही आज आम्ही सुख शोधायला भिरभिरत्या नजरेने बुवा-बाबाच्या पायाशी लोळण घालतोय.
याला प्रगती म्हणायची ?
सहजच विचार करताना मला एका काकांची आठवण झाली. त्यांच्याकडे २२०० रुपयाचा जुना मोबाईल आहे. (ते आपला मोबाईल रात्री आठ ते सकाळी आठ बंद ठेवतात. त्यांच्या मते मोबाईल फक्त संवाद साधायला वापरायला हवा. त्यात कॅमेरा काय कामाचा ?) मोबाईल बदलणे त्यांना पटत नाही. त्यामुळे जुना मोबाईल खराब झाल्यावरच ते तो बदलणार आहेत.
आपण आपल्या कडे नविनतम वस्तु असावी या अट्टाहासापायी किती वस्तु न वापरताच किंवा फार कमी वापरुन बदलतो व या सगळ्या उलाढालीत किती पैसा व्यर्थ घालवतो. बर एक वस्तु विकत घेतल्यावर लगेच महिन्यातच त्यापेक्षा चांगली नविन आवृत्ती येते व आपण परत विचार करायला लागतो अरे थोडे थांबलो असतो तर ?
सुख कशात आहे ?

रविवार, ११ जुलै, २०१०

मोबाईल.

मोबाईल माणसाच्या आरोग्यास अपायकारक आहे किंवा नाही हा विषय वादग्रस्त असु शकतो. पण मोबाईलचा वापर ज्या तर्‍हेने केला जातो त्याबद्दल वाद असु शकत नाही.
लहानपणी शाळेत शिकवतात, रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला बघून वाहन येत नाही याची खात्री करुन मग ओलांडावा. हा नियम मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडणार्‍या तरुण / तरुणींना लागू नाही कि काय असा प्रश्न मला बरेचदा पडतो.
मोबाईल वर बोलत रस्ता ओलांडणे किंवा वाहन चावताना मोबाईलवर बोलणे हे आपल्याच नव्हेतर इतरांच्याही जीवाला घातक होऊ शकते हे या तरुणांना कोण सांगणार ?
परवाचीच घटना मी ठाण्याला गोखले रोडवरुन मोटरसायकलने जात असतांना एक तरुण अचानक रस्त्यावर सरळ माझ्या दिशेने चालत आला. मी सावध असल्यामुळे बचावलो अन्यथा आम्ही दोघेही एखाद्या रुग्णालयात पोहोचलो असतो. किंवा बघुन वाहन चालवत नाही या कारणाने तेथील लोकांनी कदाचित मलाच झोडपले असते. हे झाल्यावरही त्या मुलाच्या चेहर्‍यावर जसे काहीच घडले नाही हे पाहून तर वाटले द्यावे याच्या कानाखाली.