व्यस्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यस्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

बदलते समाजजीवन - २ शाळा.

समाजात घराबाहेर पडल्यावर पहिला संबंध येतो तो शाळेचा. शाळेतच मुले अभ्यास, खेळ, सामान्य ज्ञान तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी लागणारे सर्व शिकतात. शाळेतील दिवस कोणत्याही माणसाला न विसरता येणारे असतात. एखाद्या लहान मुलासमोर त्याच्या शाळेला नावे ठेवून बघा, त्याची प्रतिक्रिया किती तीव्र असते, त्याच्या प्रतिक्रियेतच त्याचे त्याच्या शाळेबद्दलचे भावविश्व दिसते. त्यामुळेच शाळेला नावे ठेवलेली मुले सहन करु शकत नाहीत.
पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे पुर्वी एका वर्गात ३५ ते ४० मुले असायची तर आज ही संख्या बरीच वाढली आहे, काही ठिकाणी ६० ते ७० मुलेही वर्गात आढळतात.
३५ ते ४० मुले असलेला वर्ग सांभाळणे, वर्गाला शिकवणे व हे करत असताना शिक्षक त्या मुलांच्या जीवनात एक महत्वाचा भाग होऊन जायचा.  त्यावेळेस शिक्षक हा शिक्षकच असायचा. त्यामुळेच त्याला तसे करणे सोपे जायचे.
आज ६० ते ७० विद्यार्थ्यांच्या गराड्यात शिक्षक आपल्या कामाला न्याय देवू शकत नाही. त्यात त्याला जर निवडणुका ते जनगणना असे कार्यक्रम दिलेत तर, शिक्षकाने आपला अभ्यास कधि करायचा ? केलेल्या अभ्यासावर चिंतन कधि करायचे ?
शिक्षक व्यस्त व त्रस्त आणि विद्यार्थी मोकाट.

शिक्षकाला असली कामे देण्याने तो आपल्या दैनंदिन कामात लक्ष घालु शकत नाही. त्यामुळे वर्गाकडे होणार्‍या दुर्लक्षाचा गैरफायदा मुले उचलतात. अभ्यास न करणे व शालेय विद्यार्थ्याने करु नये असे बरेच उपद्व्याप शाळेतील मुले करताना दिसतात जसे वर्गातील मुलींना छेडणे, असभ्य शब्दांचा वापर, पालक तसेच शिक्षकांबद्दल अर्वाच्य शब्दांचा वापर इ. त्यामुळेच तीसर्‍या वर्गातला मुलगा आपल्या वर्गमित्रावर कात्रीने वार करु शकतो.