पोट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०

मोह !

परवा चतुर्थीला टिटवाळ्याला गेलो होतो. बरेच दिवसात जायचे होते. अचानक जोड्याने जायचा योग आला !  दर्शनाला तोबा गर्दी आणि मोठ्ठी रांग. गणपतीच्या कृपेने पायाने त्रास अजिबात दिला नाही. संपूर्ण रांगेने जात त्या चक्रव्युहातुन बाहेर पडायला एक तास लागला. गर्दीतही दर्शन छान झाल्याचा आनंद झाला.
मंदिरात जाताना गर्दीच्या काळजीने सरळ लोकलमधुन उतरुन बाहेर पडलो, कुठेही न पहाता थेट दर्शनाच्या रांगेत लागलो. दर्शन घेतल्यावर मात्र परत यायची घाई नसल्याने डोळे उघडे ठेवून निघालो आणि टिटवाळा स्टेशन अगोदर "अनंत हलवाई"चे दूकान दिसले. काय वर्णावा तो आनंद. खरतर माझ्या पोटाच्या वाढलेल्या घेराला तेच जबाबदार आहेत. चांगले खायची सवय या अनंत हलवाईच्या कल्याणच्या दुकानानेच मला लावली !
मागच्या महिन्यात पायाला झालेल्या इजेने, थोडे खाण्यावर ताबा ठेवा हा डॉक्टरचा सल्ला महिनाभर इमाने इतबारे पाळतोय मात्र परवा "अनंत हलवाई" हा दूकानावरचा बोर्ड बघुन, डॉक्टरच्या सल्ल्याकडे थोडे दूर्लक्ष केले. बरेच दिवसांनी त्यांच्या कडचे काही खायला मिळणार होतेना ! अनंत हलवाईंचे श्रीखंड, हलवा, पेठा, जिलेबी, ढोकळा, पेढा असे किती तरी पदार्थ आहेत ज्यांना मी कल्याण सोडल्या पासुन खरोखरच मुकलोय ! तरिही कोणत्याही कामासाठी कल्याणला गेलोतर माझी अनंत हलवाईला भेट असतेच. चांगले पंधरा दिवस पुरतील इतका साठा घेऊन येतो व त्यानंतर दोन महीने घरी बोलणे खातो !
अनंत हलवाई कडील पदार्थांसोबतच मला जीभेवरचा ताबा सोडायला लावणारा पदार्थ म्हणजे कचोरी. कचोरी म्हणताच चांगली फुगलेली कचोरी डोळ्यापुढे येते, त्यात छान चटणी टाकून थोडी शेव भरुन खाणे एक छान पद्धतशीर कार्यक्रम असतो. पण नागपुरला जाताना येताना शेगावला गाडी थांबताच शर्माजींची स्टेशनवर मिळणारी कचोरी मी कधिच चुकवत नाही.
शर्माजींनी आपली कचोरी ठाण्यातच उपलब्ध करुन दिल्याने माझी बर्‍यापैकी सोय झाली आहे. त्यांचे दुकान गावदेवी मैदाना जवळच आहे. स्टेशनपासुन अगदी हाकेच्या अंतरावर !
संध्याकाळी फिरायला फार लांब जायचे नसेल तर राम मारुती रोडवर जायला मला आवडते. या रस्त्याच्या एका टोकाला संत गजानन महाराजांचे मंदिर आहे तर दुसर्‍या टोकाला समर्थ भांडार, समर्थ भांडारा जवळच पोटाची घेरी वाढवायला एक उत्तम ठिकाण आहे "राजमाता", येथील वडापाव वा समोसा मला आवडतो पण मला त्यापेक्षा जास्त आवडते त्या जवळच असलेले राजमाताचेच मसाला कोकम सोडा. मला याचा मोह आवरतच नाही.
पुढच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे घरचे पदार्थ असतीलच, डॉक्टरांचा सल्ला डावलता येणार नाही पण घरच्या पदार्थांना न्याय तर द्यायलाच हवा ना !

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०१०

मिडिया !

शेकडो चॅनल्स सर्फ करत असताना आपल्याला आवडेल असे काही दिसत नाही व उगाच आपण मिडियाच्या नावाने बोटे मोडत बसतो. मालिका असो किंवा बातम्या, नको नको ते दाखवले जाते. घरात वा समाजात कधिही न दिसणारी भांडणे किंवा भानगडी हे सर्व आपण कोणत्याही मालिकेत बघु शकतो. कालच कुठली तरी हिंदी मालिका बघत असतांना त्यातील कलाकार ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर करित होते ते बघुन तर चॅनल बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. बातम्यांची पातळी तर बोलूच नये इतपत घसरलीय. चॅनल सुरु केले आहे तर ते चालवावे लागेल तर दाखवा जे काही शक्य आहे ते अशिच बहुदा मानसिकता असावी या चॅनल मालकांची.  TRP के लिए कुछ भी करेगा !
रेडिओ लावावा तर तेच, रेडिओ जॉकि नावाची नविन जमात असंबद्ध बडबड करण्यात तरबेज असते. मनात येईल ते वाट्टेल तितके बोलायचे व आपली वेळ संपली कि पुढच्याला बडबडण्यासाठी खो द्यायचा. हे सर्व चोवीस तास चालु द्यायचे.
समाजातही या सर्व मालिकांचे दुष्परिणाम दिसतात पण एक चांगला परिणाम पण झालाय ! ह्या शेकडो चॅनल्सना लागणारा कामगार वर्ग. एक चॅनल किमान दोनशे जणांच पोट भरते. एक मालिका तयार करताना स्पॉट बॉय पासुन सर्व कलाकार यांची संख्या २५० च्या वर जाते.  सर्व चॅनल्स धरलेत तर कमितकमी दोन ते तीन लाख माणसांचे पोट यावर अवलंबून आहे.
तर मालिका, बातम्या बघा अथवा बघू नका या सर्वांचे पोट भरतेय यात आनंद माना !