गर्दी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गर्दी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

शालेय - महाविद्यालयीन प्रवेश - समस्या. - १

मार्च महिन्यात दहावीची परिक्षा संपल्यावर विद्यार्थी निकाल व त्यानंतर हवा तिथे प्रवेश मिळेल कि नाही या मानसिक दडपणाखाली असतात. जवळपास सहा महिने रिकामे राहून मानसिक दडपणाखाली रहाण्याच हे वय नाही. यावर उपाय काढायला शासन स्तरावर तसेच शैक्षणीक क्षेत्रातील अनुभवी जाणकार प्रयत्नात असावेत त्यामुळेच यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बरिच सुरळीत पार पडली. तरिही या प्रक्रियेला लागणारा अकून कालावधी बघता यावर यापेक्षा चांगला तोडगा निघायला हवा असे वाटते.
अभियांत्रिकी प्रवेश ज्याप्रकारे केंद्रिभूत पद्धतीने केले जातात तसे अकरावी साठी अवलंबण्यात आले आहेत. पण अजुनही ते बरेच वेळखाऊ वाटतात तसेच त्यानंतर बारावी नंतर परत याच पद्धतीचा वापर करुन अभियांत्रीकी प्रवेश देण्यात येतात. या दोन्ही पद्धतींचा एकूण विचार केल्यावर असे वाटते कि ही पद्धत अधिक सुकर करण्यात यावी.
मागील ५ - ६ वर्षे या पद्धतीचा अभ्यास केल्यावर असे वाटते कि यात बरीच सुधारण करणे शक्य आहे. ही नविन पद्धत तयार करताना एक विचार असा आला कि विद्यार्थी जेथे रहातो त्या ठिकाणा जवळच्याच शाळा - महाविद्यालयात त्याला प्रवेश देण्यात आला तर वाहतुकीची समस्या पण काही अंशी सुटेल. कोणत्याही विद्यार्थ्याला गच्च भरलेल्या लोकल किंवा बसने प्रवास करावा लागू नये ह्याचा विचार पण करण्यात आला.
या समस्येवर सुचलेला उपाय दर आठवड्याला एक भाग या तर्‍हेने पोस्ट करण्यात येईल. सर्वांना विनंती करतो कि आपल्या सुचना अवश्य कळवाव्यात.

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

घाम !

     मी ठाणे स्टेशन जवळ घर मिळाल्यामुळे स्वत:ला फारच भाग्यवान समजतो. घरुन सक्काळी सक्काळी कॉलेजला जाताना रिक्षा वाल्याच्या मुजोरिचा सामना करावा लागत नाही कि महानगरपालिकेच्या कृपेने खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरुन जावे लागत नाही ! घराबाहेर निघताच लगेच फलाट क्रमांक एक वरुनच गाडी मिळते.
    पण काही कारणाने एक वरुन निघणारी गाडी चुकली तर ?
     तर मात्र त्याच नशिबाला दोष देण्याशिवाय व घामाघुम होण्याशिवाय माझ्या कडे पर्याय शिल्लक रहात नाही. कारण आपण सकाळच्या वेळेची ठाण्याला कोणत्याही पुलावरची गर्दी बघितली तरच माझे म्हणणे आपल्याला पटेल.
     गर्दीचा कोणताही विचार न करता रेल्वे प्रशासनाने ठाणॆ वाशी तसेच ठाणे पनवेल मार्ग खुला केलाय. त्यामुळे फलाट क्रमांक ३ व ४ ला एका वेळेस लोकल आल्यातर दोन्ही बाजुचे पुल गर्दीने तुडूंब भरुन जातात. फलाटा वरुन पुलावर चढणारे व पुलावरुन ३ व ४ वर उतरणारे प्रवासी अशा वेळेस कोणतीही शिस्त न पाळता पुढे जायचा प्रयत्न करित असतात. क्रमांक दोन वरुन फलाट क्रमांक तीनवर जायला या गर्दीमुळे जवळपास ३० मिनिटे वाया जातात. व आपल्या समोर ३ ते ४ लोकल सुटतात.  बरेचदा वाटते या परिस्थीतीत एखादा समाज कंटक भिती दाखवायला काहिजरी ओरडला तर पुलावरिल लोक सैरावैरा पळत सुटतील व होणार्‍या चेंगराचॆगरीत किमान ५०० लोक दगावतील. मागल्याच वर्षी फलाट क्रमांक ३ वर एक पाल अंगावर पडल्याने एक बाई जोरात किंचाळली होती व काय झाले हे लक्षात न घेता फलाट क्रमांक ३ व ४ वरुन लोकांनी सरळ रुळावर उड्या घेतल्याची घटना लोक विसरले नाहित. सुदैवाने मोठी प्राणहानी या वेळेस टळली होती.
      गर्दीच्या वेळेस दोन्ही पुलांवर रेल्वेला सुरक्षा रक्षक ठेवणे शक्य नाही कां ? कि रेल्वे प्रशासन एखादा अपघात घडावा याची वाट बघत आहे ?